Saturday, August 22, 2020

Top 5 websites of Ambedkarite Movement.

We are glad to sharing this information about top 5 websites of Ambedkarite movement with you because this movement has become digital. Many people and followers of Ambedkar and Buddha continuously working to grow this Ambedkarite movement world wide. Every people or follower of Babasaheb are not wealthy even though they are supporting the movement to grow online and offline. Many people youth are working on ground level to suppor the society welfare work done by Dr. Bhimrao Ambedkar. 

As everybody knows very well Dr. Ambedkar has given a successful formula for their followers that is Educate, Organise and Agitate so their followers are try to achieve the dream of their leaders of Bahujan. 

So accordingly some educated people in the field of computer and technology try to make the movement higly technical. So many engineers and tech savvy boys and girls made websites, android apps, youtube channels, whatsapp groups, facebook groups and pages to spread the thoughts of Dr. Ambedkadr and lord Buddha. 


Following are the top 5 websites of Ambedkarite Movement

1. www.brambedkar.in

2. www.velivada.com

3. www.dhammachakra.com

4. www.ambedkaree.com 

5. www.ambedkar.org


These websites are doing very great job for awareness and news updates of the Ambedkarite Mission. 


Wednesday, August 12, 2020

Monday, August 3, 2020

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू



देव कुणीही पाहिला नाही. ज्यांनी देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला; त्यांना इतरांना देव दाखविता आला नाही. सर्वच धर्मांमध्ये देवाच्या नावाने थोतांड आहे. जोपर्यंत धर्मगुरू ही व्यक्तीपूजक संकल्पना अस्तित्वात असेल तोपर्यंत देवाचे अस्तित्व कायमराहील. मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्याच्या कल्पनांना मर्यादा नाही, या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या त्याच्या बुद्धी, जिद्द आणि कार्यशक्तीलाही तोड नाही. अंधश्रद्धा ही जी सामाजिक कीड आहे ना, ती खरे तर देव या काल्पनिक पात्राने निर्माण केली आहे. जगात देव अस्तित्वात नाही, परंतु समाजातील काही आळशी आणि कर्तृत्वशून्य माणसांनीच त्याचा बागुलबुवा उभा केला.

पुरोगामी चळवळीतील उर्ध्वयू आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीरामलागू म्हणतात त्याप्रमाणे, आता देवाला रिटायर केले पाहिजेत. त्यांच्या याच विचारांचा शुक्रवारी त्यांनी पुन्हा पुण्यात पुनरूच्चार केला. आता डॉक्टरांनी सांगितले आहे, की परमेश्‍वराचे अस्तित्व हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. त्यांचे हे म्हणणे पटत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत कामकरणार्‍या माझ्या मित्रांनी आता देवावरच हल्लाबोल केला पाहिजे, मूळावर घाव घातल्याखेरीज समाजाला लागलेली अंधश्रद्धेची कीड नष्ट करता येणे शक्य होणार नाही.

मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्यापैकी फारच कमी लोकांना स्वतःच्या सामर्थ्याची जाण झालेली असते. जे स्वतःला दुबळे, कमजोर समजतात तेच देवाला शरण जातात. वास्तविक पाहाता, देव नावाची कोणतीही शक्ती अस्तित्वात नसून, तो एक भ्रमआणि खूळ आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ अभिनेते व महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील फार मोठे नाव डॉ. श्रीरामलागू यांनी पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्ङ्गीिींेींर्शे देण्यात येणार्‍या ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरणप्रसंगी जे वक्तव्य केले, ते म्हणूनच गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

डॉ. लागू म्हणाले होते, की परमेश्वराचे अस्तित्व ही सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे. डोक्यात असणारे हे खूळ काढून टाकल्याशिवाय अंधश्रद्धेचे डोंगर हटविणे अशक्य आहे. अंनिसतर्ङ्गीिींेींर्शे यंदाचा ’सुधारक’कार पुरस्कार ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांना डॉ. लागू यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. विद्या बाळ यांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान मोठे आहे.

परिवर्तनाच्या चळवळीतील त्यांचे कामही चांगले आहे. या पुरस्काराच्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा खर्‍याअर्थाने गौरव झाला असे म्हणावे लागेल. या कार्यक्रमाला रजिया पटेल, अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचीही उपस्थिती होती.

या कार्यक्रमात डॉ. लागूंनी केलेले विवेंचन मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते म्हणाले होते, की धार्मिक आणि जातीय अस्मितेचे लढे तीव्र होत असताना, दुसरीकडे मात्र सामाजिक समतेचे लढे निष्पभ्र होत आहेत. भारतीय समाजात जातीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात असून, त्यासंदर्भातील लढे अधिक तीव्र होतात ही चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे, विवेकवादाचा पाया मजबूत करणे आवश्यक असताना, हा पाया ढिसाळ करण्याचे कामकाही माणसे हेतुपुरस्सर करत आहेत. आजची परिस्थिती काय आहे.

भारतीय समाज एकीकडे वैज्ञानिक प्रगतीच्या यशोशिखरावर असताना, दुसरीकडे या समाजाची मती अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडायला तयार नाही. पूर्वीच्या शारीरिक अंधश्रद्धा आता बहुतांश लोकांनी त्यागल्या असल्या तरी नव्या स्वरुपात मानगुटीवर बसणार्‍या बौद्धिक अंधश्रद्धा पाहता, आमचे आजही अंधश्रद्धेचे ग्रहण सुटले नाही, हा विचार व्युत्पन्न होतो. अंगारे, धुपारे घेणे हे आमची वैज्ञानिक बुद्धी, अंधश्रद्धा आहे असे म्हणते. परंतु, क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर गळ्यातील लॉकेटमध्ये गणपती आणि सत्यसाई बाबा यांची छायाचित्रे मिरवतो, तेव्हा सुज्ञ माणसेही या दोन छायाचित्रांतील संकल्पनेच्या आहारी जाण्याची प्रेरणा घेत असतात.

या समाजात संत आणि चमत्कारी पुरुष नेहमीच सामान्य माणसांवर प्रभाव टाकत आले आहेत. या संत किंवा बाबा मंडळींनी कधीही देवाचे अस्तित्व नाकारले नाही. उलटपक्षी देवाचे स्तोममाजविण्यात या मंडळींनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. या मंडळींनीच समाजावर अंधश्रद्धेचा पगडा बसविण्याचे पाप केले. समाजातील धर्मगुरू किंवा हिंदू समाजात ज्यांना भूदेव म्हणून ओळखले जाते त्या मंडळींवर भलेही काही संतांनी शाब्दिक प्रहार केले असतील, परंतु देवाचे अस्तित्व कायमठेवून झालेले हे प्रकार म्हणजे पाण्यावर ओढलेल्या रेघोट्याच होते. काही संतांनी अंधश्रद्ध बाबींवर भलेही त्यांच्या अभंगांतून टीकेचे आसूड ओढले असतील.

परंतु, अंधश्रद्धेचा पाया ज्या देव या संकल्पनेवर उभा राहिला आहे, त्या देवाचे खूळ डोक्यातून बाहेर काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. एक मंदीर बांधले तर भूदेवांच्या वंशातील दहा-पंधरा लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होते. म्हणून, देव टिकला पाहिजेत, देव जगला पाहिजेत हा काही लोकांचा अट्टहास असतो. हा अट्टहास सामान्य माणसे समजून घेत नाही.

भूदेव म्हणणार्‍या मंडळींच्या पोटापाण्यासाठी देव ही संकल्पना प्रारंभी पुढे आली, दुर्देवाने आज ती भारतीय समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ हिंदू धर्मातच ही संकल्पना आहे, असे म्हणता येणार नाही. सर्वच धर्मात ती अस्तित्वात आहे. जेथे धर्मगुरु असतो, तेथे देव असतो. कारण देव नसतील तर धर्मगुरुंची पोटे भरणार तरी कशी?

फारपूर्वी डॉ. श्रीरामलागू यांनी आता देवाला रिटायर करा, अशी मागणी केली होती. पुरोगामी चळवळीतील आणखी एक उर्ध्वयू दिवंगत निळू फुले यांनीदेखील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामकरताना, देवामुळे अंधश्रद्धेला बळकटी मिळते, ही बाब मान्य केली होती. देवाला रिटायर करण्याची प्रक्रिया आवश्यक असली तरी ती वेळखाऊ आहे. नवी पिढी विज्ञाननिष्ठ निपजेल आणि तिचा स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास बसेल, तेव्हा ती देवाच्या खुळातून स्वतःला मुक्त करुन घेईल.

तोपर्यंत देवाच्या रिटायरमेण्टवर प्रश्‍नचिन्हच आहे. देवाच्याविरोधात बोललेले फारसे कुणाला पचनी पडत नाही. कारण आज प्रत्येक जण हा या संकल्पनेच्या विविध माध्यमांतून आहारी गेला आहे. एकप्रकारची बौद्धिक गुलास्वतःहून स्विकारण्यात आली आहे. परंतु, सुजाण मानवी समाजनिर्मितीसाठी देव रिटायर करणे ही अत्यावश्यक बाब आहे. मानव हा त्याच्या बुद्धीचा फार कमी वापर करतो, असे भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे जनक डॉ. एपीजे अब्दुल कलामयांनी सांगितले होते. मानव जेव्हा पूर्ण क्षमतेने बुद्धीचा वापर करण्यास शिकेल, तेव्हा निश्‍चितच प्रत्येकाच्या डोक्यातून देवाचे खूळ निघालेले असेल.

अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड मेंदू पोखरण्याचे कामकरते. एकदा मेंदू पोखरला, की कुटुंब आणि समाज पोखरण्याची प्रक्रिया सुरु झालेली असते. पूर्वीचेच अंधश्रद्धाळू आता आमची देवावर डोळस श्रद्धा आहे, असे म्हणू लागल्याचे दुर्देवी चित्र समाजात दिसते. देव हा कधीही अस्तित्वात नव्हता.

कोणीही तो अनुभवला नाही आणि पाहिलाही नाही. ज्यांनी देव पाहिला असा दावा केला असेल, त्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला. देव असेलच ना तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, गरिबी, दुःखी, पीडित माणसांच्या रुपात तो असेल. त्याची सेवा हीच ईश्‍वरसेवा, अशी विवेकानंदांना अपेक्षित असलेली कृतीशील ईश्‍वरनिष्ठा आता पुढे आली पाहिजेत. परंतु, आम्ही एखाद्या शेंदूर फासलेल्या दगडाला नैवेद्य अर्पण करतो, आणि दारी आलेल्या भिकार्‍याला पुढच्या दारी जा म्हणून सांगतो. जीव भावे शिव सेवा हा स्वामी विवेकानंदांचा देव असेल तर हा देव समाजाने का स्वीकारला नाही?

दगडांतील आणि मूर्तीतील देव आमच्या मानगुटीवर अद्यापही बसलेला कसा? या प्रश्‍नांची उत्तरे समाजाच्या मानगुटीवर देव बसविणार्‍यांनी देण्याची गरज आहे. खरे तर वैज्ञानिक प्रगती ही मानवी सामर्थ्याचे दृष्य प्रगटीकरण आहे. आकाशगंगेतील बहुतांश ग्रहांचा वेध घेतलेल्या माणसाला अद्याप स्वर्ग कुठे दिसला नाही. तो अस्तित्वात नसल्याने भविष्यातील अनेक अवकाश मोहिमांतूनही तो दिसणार नाही. परंतु, मेल्यानंतर तुला स्वर्ग पाहिजे असेल तर आता मला दान दे, असे सांगणार्‍या भामट्यांनी हा स्वर्ग कधीही समाजाच्या मेंदूतून बाहेर पडू दिला नाही.

जीवंतपणी दान देता देता भुकेकंगाल होऊन मरणारा माणूस तो स्वर्गात गेला का हे सांगू शकत नाही, हेच येथील काही भूदेवांच्या पथ्यावर पडत आले आहे. मानवी मेंदूच्या कल्पकतेतून संगणकाचा जन्मझाला, त्याने मेंदूची गतीशिलता वाढविली. परंतु, घरी संगणक आणल्यावर जोपर्यंत आपण त्याची पूजा करत बसू, तोपर्यंत आमच्या या मेंदूच्या अज्ञानाची किव करावी लागणार आहे. देवाचे अस्तित्व नाकारणार्‍याला नास्तिक म्हणून हीनवायचे आणि त्याच्या अंगावर दगडे फेकायची ही येथील समाजाची मानसिकता काहींनी निर्माण करून दिली आहे. ही मानसिकता आता बदलावी लागेल.

सहाव्या शतकात जेव्हा पायथागोरस हा पृथ्वी गोल आहे, हे सांगत होता; तेव्हा सर्वच धर्ममार्तंडांनी आणि तत्कालिन समाजाने त्याला मुर्खात काढले होते; त्याचे जीवन जगणे अवघड केले होते. परंतु, आज आपण सर्वच पृथ्वी गोल असल्याचे वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध करत आहोत. तीच परिस्थिती आज डॉ. श्रीरामलागू यांच्याबाबतीत लागू होते. देवाला रिटायर करा किंवा, डोक्यातून देवाचे खुळ काढा असे सागणारे डॉ. लागू आज भलेही समाजाला द्रुष्ट वाटत असतील.

परंतु, भविष्यात देवाचे खुळ डोक्यातून काढलेली पिढी निश्‍चितच जन्माला आलेली असेल, हा विश्‍वास ठेवू या!WhatsApp

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही… – पु.ल.देशपांडे

( ‘ एक शुन्य मी’ या पुस्तकातून ‘)


*एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात.

*समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.*

* आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. *मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.*

विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. *सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे.*
_धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील._

*मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील.

*धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.*

*_पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे._*

संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही.

*अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ.*
त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. *त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते.* दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.

कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे.

*पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.*

माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली

*पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.*

कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही.

*ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे.

*वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. *‘Justice is Simply the interest of the Stronger’.*

*मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही.
*उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही.
*साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली.

*‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते.* कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.
*लेखक- पु.ल.देशपांडे*
*(’एक शुन्य मी’ या पुस्तकातून)*

राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा.


महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी आणि परिवर्तनास आरंभ करणारी घटना म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होय. सण 1919 मध्ये माणगांवला झालेल्या परिषदेमध्ये या दोन्ही महापुरुषांची भेट झाली. आभाळा एवढी अफाट उंची असलेले निधड्या छातीच्या बेडर महामानव यांची भेट ही अविस्मरणीय आहे. 1919 ला माणगांवच्या परिषदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य शाहू महाराजांनी आरंभिल्याबद्धल अभिनंदन करून त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा.”

शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी का करावी? शाहू महाराजांना मनो-मन मान्य होते की, मागे राहिलेल्या बहुजन लोकांचा उद्धार जर काही करू शकेल तर ते शिक्षण होय. म्हणून शाहू महाराजांनी 1909 साली एक आदेश काढला त्यात महाराज म्हणतात, “सर्व मागासलेल्या लोकांची स्थिती विद्याप्रसाराशिवाय दुसरे साधन नाही.” शाहू महाराजांनी रात्र शाळा सुरू केल्या. 1907 ला मुलींच्या शाळेस मंजुरी दिली. मोफत शिक्षण, मोफत वह्या, पुस्तके तसेच शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली.
शाहू महाराज आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणकरिता अहोरात्र प्रयत्न करीत होते. प्रजेच्या सुख-दु:खात महाराज सहभागी असायचे. इतिहासातील एक प्रजादक्ष राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा आजही आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एक क्रांतिकारक जाहीरनामा हा 26 जून 1902 चा म्हणून गणला जातो. या जाहीरनाम्यामध्ये 50% जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरला शाहू महाराज एका पत्रात लिहितात की, “मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे.” शाहू महाराजांनी हे आपले कर्तव्य पार पाडले.

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एक क्रांतिकारक जाहीरनामा हा 26 जून 1902 चा म्हणून गणला जातो. या जाहीरनाम्यामध्ये 50% जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरला शाहू महाराज एका पत्रात लिहितात की, “मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे.” शाहू महाराजांनी हे आपले कर्तव्य पार पाडले. शाहू महाराज हे वसतिगृहांचे जनक आहेत. हुशार, होतकरू, निराधार विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आलेत. शाहू महाराज जातीभेद उच्चाटन सुरू करणारे महापुरुष होते. 1894 ला तमाम जनतेच्या हितासाठी-उद्धारासाठी जाहीरनामा काढला. 1908 साली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वासतिगृहांची स्थापना केली. 1911 ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला. 1912 ला एका जाहीरनाम्यात प्राथमिक शिक्षण मोफत व अनिवार्य केले. 1918 साली महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी आदेश काढला. म्हणून महान चरित्रकार धनंजय कीर शाहू महाराजांबद्दल म्हणतात, “नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत..!” टीम लेखणी चळवळीची सर्वाना आव्हान करते की, शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी. गरजू विद्यार्थ्यांना पेन-पुस्तके-वह्या-आर्थिक मदत करावी. महाराजांनी वसतिगृहे काढलीत, आपण एखाद्या गरजू-होतकरू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सांभाळ करावा. येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक कार्य पोटतिडकीने सांगूयात. येणाऱ्या 26 जूनला उच्च शिक्षणाची शपथ घेऊन हा सण साजरा करूयात.


हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...