Saturday, April 24, 2021

रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था !

 रूग्णासांठी लागणा-या रुग्णवाहिका, बेड मॅनेजमेंन्ट यासाठी सायंकाळी 6 ते सकाळी 10

यावेळेत भ्रमणध्वनी क्रमांक
 
8591377229 व 8591373936
 
यावर संपर्क साधावा.





Monday, April 19, 2021

सम्राट अशोक जयंती : भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो.


परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान व राजकीय पक्षांना विशेष करून पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या सहकार्यांना विश्वासात घेऊन भारतीय प्रशासन सुव्यवस्थित चालविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक या महान भारती सुपुत्र आणि महामानवांचा सुसंदेश व सुशासन शुभ कार्याचा अवश्य स्विकार केला पाहिजे. त्याप्रमाणे जगात आपल्या देशाची ओळख बुद्ध धम्माची व्हावी म्हणून त्यांनी संमती घेतली. बुद्ध धम्माचे प्रतिक कमळाचे फुल हे आपले राष्ट्रीय फुल केले व बोधिवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला राष्ट्रीय वृक्षाची मान्यता दिली व बुद्ध धम्माच्या धाम्माचाक्राला राष्ट्रीय चिन्ह घोषित करून भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर अंकित करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्व भारतीय संविधानाचे तत्व म्हणून स्विकारण्यात आले.


आपले राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील सर्वात पहिला रंग ज्याला आपण लाल, केशरी, भगवा, नारंगी म्हणतो त्याला भारतीय घटनेचे एका विशेष प्रकारे वर्णन केले आहे. लालसर – पिवळ्या मातीचा रंग जो बौध्द भिक्षूंच्या चीवरांचा रंग असतो. चिवर हे बौध्द भिक्षूंचे वस्त्र आहे जे त्यागाचे प्रतिक आहे. भारतीय शहीदांनी हि आपल्या प्राणाचे त्याग करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. दुसरा पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक मानले जाते. जगातील सर्व देशाशी आपला संबध शांतीचा आणि सत्याच्या आधारावर असावा असा त्यामागचा संदेश देणारा आहे. तिसरा रंग हिरवा जो निसर्गावर व प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा व बुद्ध धाम्मांचा पंचशिलेची शिकवण देणारा रंग आणि भारतीय भूमीचे सुफळा-सुजला यांचे प्रतिक आहे. या तिरंग्याच्या मधोमध बुध्द धम्माचे निळे धम्मचक्र आहे, जे साऱ्या जगाला बुध्द धम्माची ओळख देते. आपण विज्ञानाचा अविष्कार करून आपला व्यवसाय कारखाने आणि उद्योगधंदे विज्ञानाच्या चक्राप्रमाणे गतिमान करून देशाची प्रगती करायची आहे.

भारताचा सर्वोच्च पुरस्कार हि बुद्ध धम्माशी संबंधित आहे. भारत सरकार देशातील सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च व्यक्तीस ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करतो, असाच सन्मान बौद्ध धम्मात बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न असे त्रिरत्न बौद्ध धम्मात सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तीला देण्याची परंपरा आहे. आज ही महाराष्ट्रात भन्ते ज्योतीरत्न, भन्ते शन्तिरत्न, भन्ते संघरत्न या नावाचे भिक्षु आहेत. या भारतरत्न पुरस्काराचे चिन्ह स्वरूप देखील बौद्ध धाम्माशी निगडीत आहे.

बोधीवृक्षाच्या पिंपळाचे एक सोनेरी पान ज्यावर पुरस्कार स्विकारणाऱ्या व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते. दुसऱ्या बाजूला चार सिंह हि राजमुद्रा व धम्मचक्र असते. ही राजमुद्रा आपल्या देशातील चलनी नोटा आणि नाणी यावर छापलेले असतात तसेच भारत देश आणि प्रत्येक राज्याला शासकीय कागदोपत्री पृष्ठावर असणे आवश्यक असते. बहुतेक बौद्ध राष्ट्रांत भगवान बुद्धाच्या चरणी कमलचे फुल अर्पण केले जते. कमळाच्या फुलाला पाली भाषेत ‘पदम’ असे म्हणतात.

भारतरत्न या पुरस्काराच्या खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत. त्या पुरस्काराची नावे “पदम-विभूषण” “पदमभूषण ” आणि “पदमश्री” असून सर्व क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तीला हे पुरस्कार सन्मानपूर्वक दिले जाते. या पुरस्कारावर ही “कमळाचे चिन्ह” असते. “अशोक चक्र, परमवीर चक्र आणि वीर चक्र” हे युद्ध शौर्यातील भारतीय जवानांना राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात येत असलेल्या पुरस्कारावर ही “कमळाचे चिन्ह” असते. इतकेच नव्हे तर चित्रपट सृस्टीत सर्वात उच्च पुरस्कार म्हणजे ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारावर कमळाचे सोनेरी चित्र असते. तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘सुवर्णकमळ’ हा पुरस्कार दिला जतो. भारताच्या राष्ट्रपती भवनातील प्रमुख दिवाणखान्याचे नाव ‘अशोका हॉल’ आहे. सम्राट अशोकांच्या मंत्री मंडळाच्या नगरीचे नांव ‘जनपथ’ होते. दिल्ली मधील केंद्रीय मंत्री मंडळाच्या निवासस्थान परिसराचे नाव हि ‘जनपथ’ असेच आहे. उदा. ७ जनपथ, १० जनपथ, ११ जनपथ इ.

चक्रवर्ती सम्राट अशोकाची राजधानी “सारनाथ” येथील चार सिंह ही राजमुद्रा भारत सरकारची राजमुद्रा म्हणून घोषित झाली. ‘सत्यमेव जयते’ हे सम्राट आशोकांचे घोषवाक्य, ते भारतीय शासन व्यवस्थेचे ब्रीद वाक्य म्हणून मानांकित करण्यात आले. आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही बौद्ध संस्कृतीशी संबधीत आहे. अशा प्रकारे बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारत “बौद्धमय” केला आहे. यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही अशी भारतीय संविधानात तरतूद करून ठेवली आहे.


* * * * *


 



आंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – 
https://www.facebook.com/brambedkar.in/


 आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. –https://www.youtube.com/channel/UCNTHN78Rhh–1gZYJ1dwt4A 
See Less

Friday, April 16, 2021

कोरोना अपडेट: केंद्र शासनाने जारी केले राज्यस्तरीय हेल्पलाईन नंबर्स!

 State vise Corona Help Line Numbers by central government)


पाहा राज्यवार यादी :

राज्य हेल्पलाईन नंबर
आंध्रप्रदेश 0866-2410978
अरुणाचल प्रदेश9436055743
आसाम 6913347770
बिहार 104
छत्तीसगड 104
गोवा 104
गुजरात 104
हरियाणा 8558893911
हिमाचल प्रदेश 104
झारखंड 104
कर्नाटक 104
केरळ 0471-2552056
मध्यप्रदेश 104
महाराष्ट्र 020-26127394
मनिपूर 3852411668
मेघालय 108
मिझारोम 102
नागालँड 7005539653
ओडिशा 9439994859
पंजाब 104
राजस्थान 0141-2225624
सिक्कीम 104
तमिळनाडू 044-29510500
तेलंगाणा 104
त्रिपुरा 0381-2315879
उत्तराखंड 104
उत्तरप्रदेश 18001805145
पश्चिम बंगाल 1800313444222, 03323412600
संयुक्त प्रदेश हेल्पलाईन नंबर.
अंदमान आणि निकोबार 03192-232102
चंदीगड 9779558282
दादरा, नगर हवेली, दीव दमण 104
नवी दिल्ली 011-22307145
जम्मू-काश्मीर 01912520982, 0194-2440283
लडाख 1982256462
लक्षद्वीप 104
पुद्दूचेरी 104

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती जगभरात उत्साहात साजरी!

 भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चैत्यभूमी स्मारक येथे विनम्र अभिवादन केले.

हरियाणा मुख्यमंत्री डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करताना,

बीजेपी कार्यालय दिल्ली

 

भारतीय सैन्य दलातील द महार रेजिमेंटने 1 महार बटालियन मध्ये विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंची 130 वी जयंती साजरी केली.

 

अम्बेडकर जयंती के अवसर पर किसान आन्दोलन ,गाजीपुर बार्डर पर किसान नेता राकेश टिकैत ने परिसंघ कैम्प का उद्घाटन किया ।

 

https://www.facebook.com/groups/983843948335517/permalink/3947754211944461/

Thursday, April 15, 2021

लातूर जिल्ह्यासाठी #remedesivir injection चे वितरक...









करोना वॉर रूम कल्याण डोंबिवली

 करोना वॉर रूम कल्याण डोंबिवली


अ प्रभाग ९००४९३२८१९

ड प्रभाग ९००४२२७३१३

ग प्रभाग ७७१८८१९३८५

जे प्रभाग ९१३६८६२८८६

क प्रभाग ९१५२२८२४५१

एफ प्रभाग - ९१३६५१८९८५

आय प्रभाग ७७१०८३७८७२

ब प्रभाग ७३०४०५२५४३

ई प्रभाग ७७१८०८७४५३

ह प्रभाग ९०७६३९६७६६


*रेमेडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची ठिकाणे*

महापालिका कोविड रुग्णालये

आरोग्य फार्मसी, डोंबिवली ८६९१०९१०५५

आशीर्वाद मेडिकल सेंटर, डोंबिवली - ९३२२५३१३९७

अमेय फार्मसी, कल्याण पूर्व ०८९७६८९३५४५

*प्लाझ्मा मिळणाऱ्या रक्तपेढ्या*

प्लाझ्मा ब्लड बैंक डोंबिवली ०२५१ -२४३१९३२


अर्पण ब्लड बँक कल्याण-०२५१-२३१०२१०

संकल्प ब्लड बैंक कल्याण ७९४७१७३७९१

Tuesday, April 13, 2021

धम्मसेनापतींचा_धातुअवशेष_स्तूप

सांची संघारामातील स्तूप क्रं. ३ हा धम्मसेनापतींचे धातूअवशेष २२०० वर्ष सांभाळून ठेवणारा महत्वपूर्ण स्तूप आहे.


सांची येथे अलेक्झांडर कनिंगहम व फेड्रिक मैसी यांच्याद्वारे उत्खनन सुरू असताना स्तूप क्रं. ३ च्या दक्षिण बाजूला एक व उत्तर बाजूला एक अश्या दोन दगडी पेट्या सापडल्या ज्यावर सारिपुतस व महामोगलानस असे शब्द ब्राह्मी लिपि व पालि भाषेत कोरलेले आढळून आले. या वरुन हे धातूअवशेष भगवान बुद्धांचे धम्मसेनापती सारिपुत्त व महामोग्गलान यांचे आहेत हे स्पष्ट झाले.

बौद्ध सिद्धांतानुसार कनिंगहम व मैसी या विद्वानांनी असा तर्क लावला की भगवान बुद्ध नेहमी पूर्वाभिमुख होउन ध्यान व उपदेश करीत असत. सांचीचा मुख्य स्तूप हा भगवान बुद्धांचे प्रतीक आहे तर बौद्ध वाङमयानुसार सारिपुत्त हे भगवान बुद्धांचे उजवे व महामोग्गलान हे डावे हात म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे धातूआशेष सुद्धा मुख्य स्तूपासमोरच्या स्तूपात उजव्या व डाव्या बाजूला प्राप्त झालेत.


या धातूअवशेषांसोबत सोबत सतधारा येथेही सारिपुत्त – महामोग्गलान यांचे धातूअवशेष प्राप्त झाले ज्यांना १८६६ साली विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, इंग्लंड मध्ये ठेवण्यासाठी बोटीने पाठविण्यात आले. त्यापैकी एक बोट ज्यात सांचीचे धातूअवशेष होते त्या बोटीला अपघात होउन ती बोट बुडाली व सांचीचे धम्मसेनापतींचे धातूअवशेष समुद्रात विलीन झाले.

आज जे धातुअवशेष आपण चेतीयगिरी विहारात पाहतो त्या सतधारा येथील स्तूपातून प्राप्त झालेले धातूअवशेष आहेत जे महाबोधि सोसायटीच्या प्रयत्नाने १९४७ साली श्रीलंका सरकारद्वारे पुन्हा प्राप्त करण्यात आले.

प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी सांची महोत्सवात या धातूअवशेषांची श्रीलंका व मध्यप्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणूक काढण्यात येते.


अरविंद भंडारे

अध्यक्ष, पालि रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई

२९/१०/२०२०

Friday, April 9, 2021

www.brambedkar.in डॉ. बाबासाहेबावर आधारित वेबसाईटला मिळतोय प्रचंड प्रतिसाद !

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या विषयी आम्ही तयार केलेल्या वेबसाईट (www.brambedkar . in) ला गुगल सर्च इंजिन मध्ये व सोशल मीडिया मध्ये खुप प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त्य निर्माण केलेल्या ह्या वेबसाईट ला ५ वर्ष पूर्ण झाले.

५ वर्षांपासून सतत अविरत काम माझे आणि आमच्या टीम चे चालु आहे.

आंबेडकरी चळवळीचे डिजिटायझेशन करण्याचा संकल्प ठेऊन आम्ही हे कार्य चालु केलेय, तेव्हा पासुन BRAmbedkar . in वेबसाईट ला जगभरातुन छान प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत ११ लाख पेक्षा जास्त लोकांनी ह्या संकेतस्थळाला भेट दिली आहे.
गुगल सर्च इंजिन मध्ये सर्व च किवर्ड ला वेबसाईट टॉप ला आहे.

List of top performing keywords

"Buddha and his dhamma marathi book"
"ambedkar audio songs"
"ambedkar family tree"
"who were shudras pdf book"
"mukti kon pathe pdf book"
"fakira pdf book"

 





Thursday, April 8, 2021

20 ऐसे कानून और अधिकार जो हर भारतीय को जानने चाहिए



भारतीय संविधान ने लोगों के अधिकारों की रक्षा के लिए बहुत से कानूनी उपाय बताये हैं परन्तु दुर्भाग्यवश कुछ उपाय तो लोगों को अभी तक पता ही नहीं चल पाये हैं । इस लेख में हमने ऐसे ही कुछ कानूनों और अधिकारों की चर्चा की है जो कि साधारण लोगों / महिलाओं को शोषण से बचायेंगे.

भारतीय संविधान ने लोगों के अधिकारों की रक्षा के लिए बहुत से कानूनी उपाय बताये हैं परन्तु दुर्भाग्यवश कुछ उपाय तो लोगों को अभी तक पता ही नही चल पाये हैं । इस लेख में हमने ऐसे ही कुछ कानूनों और अधिकारों की चर्चा की है जो कि साधारण लोगों / महिलाओं को शोषण से बचायेंगे ।
1. ड्राइविंग के समय यदि आपके 100ml ब्लड में अल्कोहल का लेवल 30mg से ज्यादा मिलता है तो पुलिस बिना वारंट आपको गिरफ्तार कर सकती है ।
मोटर वाहन एक्ट , 1988 , सेक्शन -185,202
2 . किसी भी महिला को शाम 6 बजे के बाद और सुबह 6 बजे से पहले गिरफ्तार नही किया जा सकता है ।
आपराधिक प्रक्रिया संहिता , सेक्शन 46
3. पुलिस अफसर FIR लिखने से मना नही कर सकते , ऐसा करने पर उन्हें 6 महीने से 1 साल तक की जेल हो सकती है ।
भारतीय दंड संहिता , 166 A
4. कोई भी होटल चाहे वो 5 स्टार ही क्यों न हो , आपको फ्री में पानी पीने और वाशरूम का इस्तेमाल करने से नही रोक सकता है ।
भारतीय सरिउस अधिनियम 1887
5. / / / / / / / / / / / // /
6. यदि दो वयस्क लड़का या लड़की अपनी मर्जी से लिव इन रिलेशनशिप में रहना चाहते हैं तो यह गैर कानूनी नही है । और तो और इन दोनों से पैदा होने वाली संतान भी गैर कानूनी नही है और संतान को अपने पिता की संपत्ति में हक़ भी मिलेगा ।
घरेलू हिंसा अधिनियम , 2005
7. एक पुलिस अधिकारी हमेशा ही ड्यूटी पर होता है चाहे उसने यूनिफार्म पहनी हो या नही । यदि कोई व्यक्ति इस अधिकारी से कोई शिकायत करता है तो वह यह नही कह सकता कि वह पीड़ित की मदद नही कर सकता क्योंकि वह काटी पर नही है ।
पुलिस एक्ट , 1861
8. कोई भी कंपनी गर्भवती महिला को नौकरी से नहीं निकाल सकती ऐसा करने पर अधिकतम 3 साल तक की सजा हो सकती है ।
मातृत्व लाभ अधिनियम , 1961
9. टैक्स उल्लंघन के मामले में कर वसूली अधिकारी को आपको गिरफ्तार करने का अधिकार है लेकिन गिरफ्तार करने से पहले उसे आपको नोटिस भेजना पड़ेगा । केवल टैक्स कमिश्नर यह फैसला करता है कि आपको कितनी देर तक हिरासत में रहना है ।
आयकर अधिनियम , 1961
10. तलाक निम्न आधारों पर लिया जा सकता है : हिंदू मैरिज एक्ट के तहत कोई भी ( पति या पत्नी ) कोर्ट में तलाक के लिए अर्जी दे सकता है । व्यभिचार ( शादी के बाहर शारीरिक रिश्ता बनाना ) , शारीरिक व मानसिक प्रताड़ना नपुंसकता बिना बताए छोड़कर जाना , हिंदू धर्म छोड़कर कोई और धर्म अपनाना , पागलपन , लाइलाज बीमारी वैराग्य लेने और सात साल तक कोई अता - पता न होने के आधार पर तलाक की अर्जी दाखिल की जा सकती है ।
हिंदू मैरिज एक्ट की धारा -13
11 . मोटर वाहन अधिनियम की धारा 129 में वाहन चालकों को हेलमेट लगाने का प्रावधान है । मोटर वाहन अधिनियम की धारा 128 में बाइक पर दो व्यक्तियों का बैठने का प्रावधान है । लेकिन ट्रैफिक पुलिस के द्वारा गाड़ी या मोटरसाइकिल से चाबी निकालना बिलकुल ही गैर कानूनी है इसके लिए आप चाहें तो उस कांस्टेबल / अधिकारी के खिलाफ कानूनी कार्यवाही भी कर सकते हैं ।
मोटर वाहन अधिनियम
12. केवल महिला पुलिसकर्मी ही महिलाओं को गिरफ्तार कर थाने ला सकती है । पुरुष पुलिसकर्मियों को महिलाओं को गिरफ्तार करने का अधिकार नहीं है । इतना ही नहीं महिलाएं शाम के 6 बजे से सुबह के 6 बजे के बीच पुलिस स्टेशन जाने से मना कर सकती हैं । एक गंभीर अपराध के मामले में मजिस्ट्रेट से लिखित आदेश प्राप्त होने पर ही एक पुरुष पुलिसकर्मी किसी महिला को गिरफ्तार कर सकता है ।
दंड प्रक्रिया संहिता , 1973
13. बहुत ही कम लोग इस बात को जानते हैं कि यदि उनका गैस सिलेंडर खाना बनाते समय फट जाये तो आप जान और माल की भरपाई के लिये गैस कम्पनी से 40 लाख रुपये तक की सहायता के हक़दार हैं ।
14. आपको यह जानकर अचरज होगा कि यदि आप किसी कंपनी से किसी त्यौहार के मौके पर कोई गिफ्ट लेते हैं तो यह रिश्वत की श्रेणी में आता है । इस जुर्म के लिए आपको सजा भी हो सकती है ।
विदेशी अंशदान नियमन अधिनियम ( FCRA ) 2010
15. यदि आपका किसी दिन चालान ( बिना हेलमेट के या किसी अन्य कारण से ) काट दिया जाता है तो फिर दुबारा उसी अपराध के लिए आपका चालान नही काटा जा सकता है ।
मोटर वाहन ( संशोधन ) विधेयक , 2016
16. कोई भी दुकानदार किसी उत्पाद के लिए उस पर अंकित परन्तु उपभोक्ता , अधिकतम खुदरा मूल्य से कम पर उत्पाद खरीदने के लिए दुकानदार से भाव तौल कर सकता है ।
अधिकतम खुदरा मूल्य अधिनियम , 2014
17. यदि आपका ऑफिस आपको सैलरी नही देता है तो आप उसके खिलाफ 3 साल के अन्दर कभी भी रिपोर्ट दर्ज करा सकते हैं । लेकिन यदि आप 3 साल के बाद रिपोर्ट करते हैं तो आपको कुछ भी हासिल नही होगा |
परिसीमा अधिनियम , 1963
18. यदि आप सार्वजनिक जगहों पर " अश्लील गतिविधि " में संलिप्त पाये जाते हैं तो आपको 3 महीने तक की कैद भी हो सकती है । परन्तु " अश्लील गतिविधि " की कोई स्पष्ट परिभाषा नही होने के कारण पुलिस इस कानून का दुरूपयोग करती है |
भारतीय दंड संहिता की धारा 294
19. यदि आप हिन्दू हैं और आपके पास आपका पुत्र है , पोता है या परपोता है तो आप किसी दूसरे लड़के को गोद नही ले सकते हैं । साथ ही गोद लेने वाले व्यक्ति और गोद लिए जाने वाले बच्चे के बीच कम से कम 21 वर्ष का अंतर होना जरूरी है ।
हिंदू गोद लेना और रखरखाव अधिनियम , 1956
20. यदि आप दिल्ली में रह रहे हैं तो आपका मकान मालिक आपको बिना नोटिस दिए जबरन मकान खाली नही करा सकता है ।
दिल्ली किराया नियंत्रण अधिनियम 1958 , धारा 14
जय भीम जय संविधान जय विज्ञान

शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर!

प्रत्येक आंबेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे ...खुप गैरसमज आहेत शिवाजी महाराज अणि डॉ बाबासाहेबांन बद्दल.....

मुद्दामपणे शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठा समाज ह्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न कुठलीही अभ्यास नसलेली व्यक्तीच करू शकते . प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या काळाची परिस्थिती त्यातील बदल त्या काळानुरूप महापुरुषाकडून होतात . शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करून राजकीय बदल केला परंतु त्यांना धार्मिकतेचा डोंब ब्राह्मणी परंपरा असल्याने सामाजिक बदल ते करू शकले नाहीत हे एक सत्य आहे
"1:- महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय शिवरायच्या" घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेवून केली."
- --> सदर पहिला मुद्दा पोष्ट करणाऱ्याने टाकलेला आहे .यात सत्याग्रहाची सुरुवात शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली हे म्हणणे अगदी अज्ञानी वृत्तीने आणि कुठलीही माहिती न घेता केलेले आहे .महाडचा ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह *२० मार्च १९२७* ला झाला .अनेक इतिहासाची पाने चाळली अनेक खंड जरी चाळून बघितले तरी बाबासाहेब चवदार तळ्याच्या सत्याग्रहापुर्वी रायगडावर गेलेच नव्हते त्यामुळे रायगडावर जाऊन दर्शन घेऊन सत्याग्रहाची सुरुवात केली हे चुकीचे आहे .बाबासाहेब रायगड किल्ला बघण्यासाठी आपल्या अनेक लोकांसोबत २९ डिसेंबर १९२७ ला गेले होते तेंव्हा रात्री आपल्या अनुयायासोबत मुक्काम केला असता ,बाबासाहेब आंबेडकर यांचावर प्राणघातक हल्ला* करण्यासाठी ५० ते ६० मराठा लोक बंदुकी ,हत्यारे घेऊन गडाच्या दिशेने निघाल्याची बातमी महार कार्यकर्त्यांना कळाली तेंव्हा रात्री गडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर जमल्यामुळे मराठा समाजातील हल्लेखोर तिथे भीतीने येउच शकले नाही .( संदर्भ – भीमराव रामजी आंबेडकर खंड ३ ,ले .चांगदेव भगवानराव खैरमोडे , पा.नं .२१३ ). उलट हा प्रकार होऊन केसरी या वृत्तपत्राने तत्कालीन आमदार नारायण गुंजाळ यांचे बाबासाहेबांच्या वरील आक्षेपार्ह्य भाषण छापून आंबेडकर यांनी शिवाजीच्या सिंहांसणावर बसून सिंहासन भ्रष्ट केले .त्यावर बाबासाहेबांनी नारायण गुंजाळ आणि केसरी चे संपादक नरसोपंत केळकर यांना नोटीस पाठवली .त्याही नंतर "कुलाबा समाचार " या वृत्तपत्राने "डॉ .आंबेडकरांच्या रायगडावरील लीला " असे हेडिंग देऊन आगपाखड केली .यानंतर रा .चित्रे ,सहस्त्रबुद्धे या सारख्या *ब्राह्मणमंडळींनी बाबासाहेबांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी मराठा समाजाला समजवण्यासाठी व्याख्याने दिली.
"2:- बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते."
---> माझ्या माहितीप्रमाणे अस कुठलही व्याख्यान बाबासाहेबांनी दिलेलं नाही.
"3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात
"जय शिवराय" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत."
---> महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या खंडात एकूण २३६पत्रे आहेत.या ग्रंथाची एकुण पृष्ठ संख्या ४३४ आहे. त्यातल्या नेमक्या कोणत्या पत्राची सुरूवात बाबासाहेबांनी "जय शिवराय" लिहून केलीय हे समजून घ्यायला मला आवडेल.निदान या खंडात तरी असे एकही पत्र नाही. मी बाबासाहेंबांची इतरही प्रकाशित / अप्रकाशित पत्रे पाहिलेली व वाचलेली आहेत. *माझ्या पाहण्यात तरी असे कोणतेही पत्र आलेले नाही. हे खुद्द महाराष्ट्र शासनाच्या "डॉ .बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" प्रसिध्द करणाऱ्या प्रा .हरी नरके यांच मत आहे* त्यामुळे बाबासाहेबांना कनिष्ठ दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे .दोन्ही महापुरुष आपापल्या योग्य ठिकाणी आहेत पण वर्णव्यवस्थेत *शूद्र* ठरलेल्या जातीसाठी हा प्रकार करणे अगदी चुकीचा आहे .
"4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राम्हणांनी नाकारला होता.तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला."
- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आहे . शिवरायांच स्वराज्य मावळ्यांना सोबत घेऊन मिळविलेल स्वराज्य राजकीयदृष्ट्या अगदी सत्य आणि आदरणीय असलं तरी त्याकाळी धार्मिक सत्ता जे ठरवील वैदिक परंपरा जे सांगेल तेच केल्याशिवाय त्याला मान्यता नव्हती . याबद्दल खुद्द डॉ .बाबासाहेब आंबेडकर आपल्या Who were Shudras? अर्थात शुद्र पूर्वी कोण होते ? या ग्रंथात पान.क्र. १९५ वर लिहितात कि " *शिवाजी एका स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता व त्यानी स्वत :ला महाराजा व छत्रपती हे खिताब घेतलेले होते .त्याच्या प्रजेपैकी बरेचसे ब्राम्हण होते .अशी परिस्थिती होती तरीसुद्धा आपला राज्याभिषेक विधी करवून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राम्हणावर सत्ता गाजविता आली नाही .राज्यभिषेकाचा विधी जर कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राम्हणाच्या हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेली आहे ,म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे .राज्याभिषेकाचा विधी जर ब्राम्हणेतराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफल होत नसतो .म्हणजे तो वांझ ठरतो ." यावरून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना चातुर्वर्ण वैदिक परंपरेत मनुस्मृती नुसार शुद्र ठरविले होते परंतु शिवाजी महाराजांनी काशीच्या गागा भट ला अमाप संपत्ती देऊन हा विधी घडवून आणला होता* एकंदरीत ब्राह्मणी व्यवस्था तोडण्याऐवजी शिवाजी महाराजांनी त्याच व्यवस्थेत राहून त्याच पालन राज्याभिषेकासाठी करणे उचित मानले होते त्यासाठी होणारा विरोध असून पण त्या वर्णव्यवस्थेच्या बेड्या तोडण्याऐवजी त्यात राहणेच उचित समजले होते .हे ही ऐतिहासिक सत्य आहे त्यामुळे वरील मुद्द्यातील राज्यभिषेक आणि मनुस्मृती दहन याचा कसलाच सबंध नव्हता .मनुस्मृती मधील अमानवीय गोष्टीना विरोध म्हणून मनुस्मृतीने दहन केले होते .
"5:- बाबासाहेब म्हणतात संविधान लिहते वेळी मला जास्त ञास झाला नाही कारण छञपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते.म्हणूनच मी संविधान लिहु शकलो."
- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आणि खोडसाळपणाचा आहे . डॉ .बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिताना अत्यंत कष्ट घेतले होते प्रचंड अभ्यास केला होता .५२ देशांच्या घटनांचा अभ्यास तसेच बाबासाहेबांच्या लिखाणात वाचनात बुद्धकालीन इतिहास होता त्यामुळे *बुद्धकालीन गणराज्य (Republican) पद्धती* जी लोकशाही मार्गाने निर्णय घेत असत त्यात अनेक गणराज्य होती लीच्छ्वी सारखी गणराज्ये होती जी लोकशाही पद्धतीने राज्य करीत होती .तसेच भगवान बुद्धाच्या समता ,स्वातंत्र्य ,बंधुत्व ,न्याय या तत्वांचा अंतर्भाव राज्यघटनेत बाबासाहेबांनी केलेला होता . (संदर्भ- घटना समितीतील वादविवाद व भाषणे) त्यामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते म्हणून संविधान लिहू शकलो ही वाक्ये टाकणे म्हणजे हा मूर्खपणा आणि खोडसाळपणा आहे असे मी समजतो यात *शिवाजी महाराजांचा विरोध अजीबात नाहीच* पण अशा पोष्ट प्रसारित करणाऱ्या मूर्ख लोकांच्या अडाणीपणाची कीव वाटते . *शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजकीयदृष्ट्या सत्य जरी असलं तरी धार्मिक ,सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या अस्पृश्य ,शुद्रातीशुद्र लोकांना जातीयव्यवस्थेच्या पायथ्याशीच राहावे लागत होते . निवडक प्रतिनिधित्व किल्लेदार ,जहागीरदार महार ,अस्पृश्य लोक जरी असले तरी त्यांच प्रमाण प्रातिनिधिक स्वरुपात होत* शिवाजी महाराजांना राजकीयदृष्ट्या अधिकार जरी असले तरी *सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक बदल करण्याचा अधिकार नव्हता* . अस्पृश्य महार लोक निवडक किल्लेदार ,जहागीरदार जरी असले तरी त्यांना अष्टप्रधानमंडळात कुठे स्थान होत ? अष्टप्रधानात असलेली मंत्रीमंडळात मोरोपंत त्रिंबक पिंगळे , रामचंद्र निलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, दत्ताजीपंत त्रिंबक, हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, निराजीपंत रावजी, रघुनाथराव पंडीत या सारख्या मंडळीमध्ये अस्पृश्य शुद्रांतीशुद्र वर्ग कुठे होता ? आजची पडका सिंहगड किल्ला निरखून पहिला असता "महार टाके" ,"मराठा टाके" असे पिण्याचे पाण्याचे हौद त्याकाळी वेगवेगळ्या स्वरुपात होते त्यामुळे शिवाशिव ,बाट ,अस्पृश्यता त्याकाळी होतीच *एक राजा म्हणून एक आदेश जर शिवरायांनी दिला असता तर एका आदेशाने अस्पृश्यता ,जातीयता नष्ट होऊन समानता निर्माण झाली असती तिथे खरच स्वराज्य समानतेवर असत तर तिथे बाबासाहेबांना हालापेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या ,तिथे खरच स्वराज्य समोर असत तर संविधान लिहिण्याची गरजही पडली नसती* .
"6:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना "कृष्णराव. अर्जुन केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र"
भेट दिले होते. या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने"मराठा" होते."
---> हे जरी खर असलं केळुस्कर गुरुजींनी शालेय जीवनात बाबासाहेबांना सदैव प्रेरणा दिली पण त्यांची जात मराठा होती म्हणून जातीसाठी अशा पोष्ट्द्वारे गवगवा करणे योग्य वाटत नाही . बाबासाहेबांनी पुढे चालून प्रत्येक धर्माचा अभ्यास केला बौद्ध धर्माची निवड केली त्यामुळे मराठा जातीमुळे केळुस्कर श्रेष्ठ ठरले आणि त्यांनी बुद्धचरित्र भेट दिल म्हणून बाबासाहेबांना धर्मांतर करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होय .अस असेल तर केळुस्कर गुरुजींनी अगोदरच बौद्ध धर्म स्वीकारला नसता का?
"7:-छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले उधळली होती."
---> अगदी बरोबर शाहू महाराजांनी जे बाबासाहेबांना जातीच्या बाहेर जाऊन हेरल होत ते सवर्ण जातीत अडकणारे जातीचाच विचार करू शकतात त्याही काळात शाहू महाराज अस्पृश्यांसाठी सामाजिक बदल करीत होते तेंव्हा आता जे त्यांना जातीत गोठवण्याचा प्रकार करणारे लोक त्यांना *"धेडांचे महारांचे राजे" म्हणून उल्लेख करत .
"8:-राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते....."
---> परत इथे जातीच्या किडलेल्या मनाचा दुर्गंध येतो सयाजीरांवाना जातीच्या बेड्यात अडकवून केवळ ते मराठा होते म्हणून श्रेष्ठ होते आणि त्यांनी बाबासाहेबांना परदेशात जाण्यासाठी सहाय्य केल .मुळात सयाजीराव गायकवाड यांच्या प्रशासनात नियम होता कि जे जे विद्यार्थी निष्णात आहेत ,हुशार आहेत मग ते जातीने ,कुळाने कुणीही असो त्यांना शिक्षणानासाठी आर्थिक सहाय्य करणे अर्थात आजच्या भाषेत बँकाप्रमाणे ऋण लोन देणे आणि त्याची *परतफेड* आपल्या संस्थानामध्ये नोकरीमधून त्या विद्यार्थाचे कर्ज परतफेड घेणे अर्थात बाबासाहेबांनी परदेशातून परत आल्यावर पिता रामजीचा विरोध पत्कारून बडोदा संस्थानात प्रचंड जातिवाद असताना सुद्धा नोकरी करून त्यांचे ऋण फेडले अर्थात रामजी बाबा ना बडोदा मधील हे जातीचे चटके त्रास माहित होता म्हणून ते बाबासाहेबांना जाण्यापासून रोखत होते .तरीसुद्धा बाबासाहेबांनी चटके सहन करून संस्थानाच्या कराराच पालन केल
"9:- बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटीत व्हा ,हा संदेश मराठा बहुजनांना दिला.
"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला आपला " भिमराव " या देशाचा शिल्पकार झाला..........! "
- --> सदर मुद्यात बाबासाहेब देशाचे शिल्पकार आहेत हे डोळे लावून सत्य असलं तरी शिकवा ,चेतवा ,संघटित रहा, हा संदेश समस्त भारतीयास दिला त्यालाही विशिष्ट जातीलाच दिला किंवा केवळ मराठा बहुजनांना दिला असा नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकास दिलेला आहे . युरोप खंडात जातीव्यवस्था किंवा जात नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती ना आहे ही जातीयव्यवस्था आणि चातुर्वर्णव्यवस्थेत शुद्राती शुद्र ठरविलेली जात नेपोलीयन बोनापार्ट ला लावणे केवळ हास्यास्पद गोष्ट आहे .
सदर पोष्ट अनेक महिन्यापासून सोशल मिडिया मध्ये फिरतात आणि काही जण अभ्यास न करता इतिहासाची जाण न ठेवता सदर मजकूरच प्रमाण आहे असे मानून तोच खरा इतिहास मानत असतील तर हा निव्वळ अडाणीपणा आहे .इथे बाबासाहेब आंबेडकर ,शाहू महाराज यांना जातीचे लेबल लावून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे उपकार केलेले आहे अस भासवून जातीचा अंहभाव दाखविणे आणि महापुरुषाचा जय जयकार करणे दोन्हीही विरोधाभासी आहे . बाबासाहेब असो कि शाहूमहाराज त्या त्या काळानुरूप या महापुरुषांनी काळाचा विचार करून पाऊले उचलली आहेत .शिवाजी महाराजांची सामाजिक बदलापेक्षा स्वराज्य मिळवणे अग्रणीय मानले ती त्या काळाची गरज म्हणून आणि बाबासाहेबांनी सामाजिक बदलासह मानवजातीच्या अधिकारासाठी मानवमुक्तीचा लढा दिला तोही मोठा श्रेष्ठच आहे .त्यामुळे सदर अश्या अनेक पोष्ट आहेत ज्यात बाबासाहेबंशी जोडुन दुसर्याला मोठ करण्यात आलेले आहेत म्हणून मला खोट्या आधार नसलेल्या गोष्टींचा गवगवा यांचे खंडण करावे वाटले म्हणून हा सदर लेख .
प्रवीण जाधव

राजा असावा तर सम्राट अशोका सारखा!

अशोकाच्या काळात भारताने जगातली ३३ टक्के बाजारपेठ काबीज केली हाेती म्हणूनच जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व होते.प्रत्येक व्यापारी कर भरताे किंवा नाही हे कसोटी ने पाहिले जात हाेते.कर वाढवण्यासाठी शेतीमाल व व्यापारवाढीचे प्रयत्न केले जात.सम्राट अशोकाचे गुप्तहेर सर्व प्रदेशभर पसरले होते आणि म्हणून प्रत्येक विभाग आणि प्रधानमंत्र्याच्या कामाचा तपशील त्याला मिळत असे.प्रत्येक गावाची माहिती त्याच्याकडे असे.याच कारणामुळे राजधानीपासून बाराशे मैल लांब असणाऱ्या काबूलवर जसा त्याचा वचक होता तसेच शेकडो मैल दूर असणाऱ्या गिरनारमध्येही दबदबा हाेता. राज्याभिषेकाच्या नवव्या वर्षी केलेल्या कलिंग युद्धानंतर पुढील अठ्ठावीस वर्षे सम्राट अशोकाचे राज्य निर्विघ्नपणे,कुठलेही युद्ध न करता,प्रजेच्या हिताची काळजी घेणारे आदर्श राज्य ठरले.कलिंगाच्या युद्धानंतर अशोकाने स्वत:ला पूर्णपणे लोककल्याणासाठी झोकून दिले.आपल्या प्रजेला कुठलाही त्रास होऊ नये,कुणावर अन्याय होऊ नये यासाठी ताे दक्ष असे.बौद्ध धम्माचे विचार पटल्यामुळे,अशोकाला आपल्या प्रजेने नीतीनुसार आचरण करावे असे वाटे.भारताच्या लिखाणाचा इतिहास सम्राट अशोकाच्या शिलालेखापासून प्रारंभ हाेताे.२२०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने दिलेला संदेश आजही किती चपखल लागू पडताे! एकंदरीत आदर्श,लोककल्याणकारी राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक.सम्राट अशोकाने सुशासनाच्या संदर्भात घालून दिलेल्या परिमाणांचे जतन अाणि संवर्धन केले जावे अशीच त्याची अपेक्षा असणार आहे



Wednesday, April 7, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीची सर्व माहिती आमच्या वेबसाईटवर !

भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त्य सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. 

आमची वेबसाईट www.brambedkar.in ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनी करण्यात आली. 



आंबेडकरी चळवळीचे डिजिटायझेशन करण्याचे ध्येय्य उराशी बाळगून ह्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 

सलग ५ वर्षांपासून वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारातील समाज निर्माण करण्याच्या कार्यात आमच्या वेबसाईट चा खारीचा वाटा आहे. 

कसलीही आर्थिक नसताना मोजक्या लोकांसह ह्या www.brambedkar.in वेबसाईट चे कार्य चालू आहार. 

आमच्या वेबसाईट मध्ये डॉ. बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्या विषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला .आहे. 

- Premsagar Gavali (Cyber Lawyer)


Top performing pages of our website

संविधान सुरक्षा आंदोलन प्रेस कॉन्फ्रेंस,

 from the facebook wall of Rajratna Ambedkar

अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?


१. कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा

२. कामगार राज्य विमा (ESI)
३. कामाचे १२ तासावरून ८ तास
४. कामगार संघटनेची मान्यता
५. भर पगारी सुट्या
६. महागाई भत्ता
७. कायदेशीर संपाचा अधिकार
८. आरोग्य विमा
९. कामगार कल्याण निधी ( labour welfare fund
१०. निर्वाह निधी (provident fund)
११. पालकत्वाचा अधिकार
१२. घटस्फोटाचा अधिकार
१३. प्रसूती पगारी रजा
१४. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार
१५. स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार
१६. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार
१७. महिला कामगार सरंक्षण कायदा (women labour protection act)
१८. मतदानाचा अधिकार
१९. भारतीय सांख्यिकीक कायदा ( indian statistical law)
२०. तांत्रिक प्रशिक्षण योजना (technical training scheme)
२१. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती (central technical power board)
२२. विद्युत जोड प्रकल्प (power grid system)
२३. राज्य विभागणी आयोग (state division commission)
२४. मध्यवर्ती जलसिंचन आयोग
२५. अर्थव्यवस्थेची तरतूद (provision of finance commission)
२६. नदी जोड प्रकल्प
२७. दामोदर खोरे प्रकल्प
२८. हिराकुंड धरण
२९. भाक्रा-नांगल धरण
३०. सोनेक नदी प्रकल्प
३१. भारतीय रिझर्व्ह बँक
३२. रोजगार विनिमय (employment exchange)
आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे #संविधान....लव्ह यु बाबासाहेब.

भारतीय रिझर्व बँकेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, "भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण, भौगोलिक रचना, भारतीय व्यापार, शेती,भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबतींची सखोल माहिती जर कोणाला असेल तर ते डॉ.आंबेडकर हे आहेत. संविधान निर्मितीसाठी त्यांच्यासारखा विद्वान पंडित कोणी नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत डॉ.आंबेडकरांना संविधान समिती मध्ये निवडून आणा."

आर्थिक विकासासंदर्भात डॉ.आंबेडकर यांच्या मते, अल्पभूधारकांवर आधारित भारतीय शेतीची उत्पादकता व उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण शेतीमधील अल्प भांडवली गुंतवणूक हे आहे. फक्त शेतीच नव्हे तर कामगारांचे आर्थिक धोरण यावर सुद्धा त्यांनी विस्तृत विचार मांडणी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील संपुर्ण घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला होता. त्यात भारतीय अर्थव्यवस्था व त्यावरील समस्यांचे उपाय यावर त्यांनी जागतिक दर्जाच्या तीन पदव्या प्राप्त केल्या.



अर्थशास्त्रावर तीन विद्वत्तापूर्ण प्रबंध कोलंबिया(अमेरिका) व लंडन विद्यापीठाला एम.ए. पीएचडी, व डीएस्सी, साठी सादर केले आणि विशेष म्हणजे पुढे तीनही प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.
१.(Administration and Finance of the East India Company) - ईस्ट इंडिया कंपनी:प्रशासन आणि वित्तप्रणाली यात इ.स.१७९२ ते १८५८ या कालखंडातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचा ऐतिहासिक आढावा, ज्यात ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली भारतीयांना कशा हालअपेष्टा भोगाव्या लागल्या त्यावर परखड भाष्य डॉ.आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.
२.(The Evolution of Provincial Finance in British India) - ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती यामध्ये प्रामुख्याने इ.स.१८३३ ते १९२१ या कालखंडातील ब्रिटिश भारतातील केंद्र शासन व घटक राज्ये यांच्यातील आर्थिक संबंधाचे चिकित्सक विश्लेषण जे केंद्र आणि राज्याच्या आर्थिक संबंधाच्या बाबतीत महत्वपूर्ण आहे.
३.(The problem of the Rupee: its origin and Its Solution) - भारतीय रुपयाचा प्रश्न:उद्गम आणि उपाय या प्रबंधात भारतीय अर्थव्यवस्थेच्या घडीसाठी उपाययोजना बाबतीत अतिशय सूक्ष्म आणि चिकिस्तक पद्धतीने मांडणी केली आहे. 'भारतासाठी सुयोग्य चलन पद्धती कोणती?' आर्थिक धोरणे या व त्या काळाच्या गहन प्रश्नांची चर्चा करणारा अत्यंत मौलिक असा अर्थशास्त्रीय दस्तावेज आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या स्थापनेत नेमके काय योगदान आहे हे महत्वाचे आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४-२५ मध्ये ब्रिटिश सरकारने रॉयल समिती नेमली होती. त्यालाच ( Hilton Young Commission) असेही म्हटले जाते. या समितीकडून अर्थव्यवस्थेवर बोलण्यासाठी डॉ.आंबेडकरांना आमंत्रित केले होते. आणि विशेष म्हणजे त्या समितीतील प्रत्येक सभासदांकडे (The problem of the Rupee) हे पुस्तक होते. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक सभासद हा या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग करू पाहत होता. हे पाहून डॉ.आंबेडकर हर्षित झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समितीसमोर भारतीय चलनात असलेल्या अडचणी व त्यावरील उपाय, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, वित्तीय धोरण, चलनाचा मापदंड काय असावा,सामूहिक शेतीव्यवसाय,
आर्थिक धोरण, जमीनदारी पद्धती, जमीन कर या सर्वांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सर्वात महत्वाचे चलन विनिमय व्यवस्थेत 'सोने' हा मापदंड मानला पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले.
पहिल्या महायुद्धानंतर १९३५ साली ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेली भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत चालू राहावी, म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याचे ठरले. आणि ही बँक (Hilton Young Commission) या समितीच्या तपशील लक्षात घेऊन स्थापन करण्यात आली.बाबासाहेबांनी लिहलेल्या वरील तीनही पुस्तक प्रबंधाचा उपयोग हा 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या' स्थापनेचा पाया ठरला. आणि ही मध्यवर्ती बँक अस्तित्वात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली यावर आजही ही बँक तटस्थ उभी आहे. १ एप्रिल १९३५ मध्ये बँकेची स्थापना करण्यात आली खरी मात्र १९४९ मध्ये ही खऱ्या अर्थाने भारतीयांच्या ताब्यात घेण्यात आली.
बाबासाहेब हे किती महान अर्थशास्त्रज्ञ होते हे यावरून लक्षात येईल.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ साली ५०० व १००० रू.च्या नोटांचे विमुद्रीकरण केले. ही मूळ संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या (Problem of the Rupee) या पुस्तक प्रबंधामधून घेण्यात आली होती.
सेवायोजन कार्यालयांची(Employment Exchange) ची स्थापना, (Skill Development) ची पायाभरणी याचे संपूर्ण श्रेय डॉ.आंबेडकरांना जाते. त्यांच्यामुळेच ही भारताला देणगी लाभलेली आहे.
"भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ डॉ.अमर्त्य सेन ज्यांना अर्थशास्त्रामध्ये ' नोबेल पारितोषिक' मिळाले आहे ते असे म्हणतात.
"डॉ.आंबेडकर हे अर्थशास्त्रात माझे वडील आहेत. त्यांच्याऐवढा जागतिक कीर्तीचा महान अर्थशास्त्रज्ञ होणे नाही."
लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, विद्यापीठात डॉ.आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचबरोबर 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन' देखील चालू करण्यात आले आहे.
जगाने बाबासाहेबांचा खूप मोठा यथोचित सन्मान केला. मात्र भारताने RBI बँकेच्या स्थापनेपाठीमागील सर्वात महान योगदान बाबासाहेबांचे असताना त्यांचा पाहिजे तेवढा सन्मान केला नाही. भारतासाठी ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
Via मूकनायक - Muknayak

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...