Get all information about Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar. Quotes, Photos, rare images, original videos, writings and speeches, Books written by B.R. Ambedkar
Sunday, April 25, 2021
Saturday, April 24, 2021
रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था !
रूग्णासांठी लागणा-या रुग्णवाहिका, बेड मॅनेजमेंन्ट यासाठी सायंकाळी 6 ते सकाळी 10
Friday, April 23, 2021
Thursday, April 22, 2021
Monday, April 19, 2021
सम्राट अशोक जयंती : भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!
‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो.
परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान व राजकीय पक्षांना विशेष करून पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या सहकार्यांना विश्वासात घेऊन भारतीय प्रशासन सुव्यवस्थित चालविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक या महान भारती सुपुत्र आणि महामानवांचा सुसंदेश व सुशासन शुभ कार्याचा अवश्य स्विकार केला पाहिजे. त्याप्रमाणे जगात आपल्या देशाची ओळख बुद्ध धम्माची व्हावी म्हणून त्यांनी संमती घेतली. बुद्ध धम्माचे प्रतिक कमळाचे फुल हे आपले राष्ट्रीय फुल केले व बोधिवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला राष्ट्रीय वृक्षाची मान्यता दिली व बुद्ध धम्माच्या धाम्माचाक्राला राष्ट्रीय चिन्ह घोषित करून भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर अंकित करण्यात आले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्व भारतीय संविधानाचे तत्व म्हणून स्विकारण्यात आले.
आपले राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील सर्वात पहिला रंग ज्याला आपण लाल, केशरी, भगवा, नारंगी म्हणतो त्याला भारतीय घटनेचे एका विशेष प्रकारे वर्णन केले आहे. लालसर – पिवळ्या मातीचा रंग जो बौध्द भिक्षूंच्या चीवरांचा रंग असतो. चिवर हे बौध्द भिक्षूंचे वस्त्र आहे जे त्यागाचे प्रतिक आहे. भारतीय शहीदांनी हि आपल्या प्राणाचे त्याग करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. दुसरा पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक मानले जाते. जगातील सर्व देशाशी आपला संबध शांतीचा आणि सत्याच्या आधारावर असावा असा त्यामागचा संदेश देणारा आहे. तिसरा रंग हिरवा जो निसर्गावर व प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा व बुद्ध धाम्मांचा पंचशिलेची शिकवण देणारा रंग आणि भारतीय भूमीचे सुफळा-सुजला यांचे प्रतिक आहे. या तिरंग्याच्या मधोमध बुध्द धम्माचे निळे धम्मचक्र आहे, जे साऱ्या जगाला बुध्द धम्माची ओळख देते. आपण विज्ञानाचा अविष्कार करून आपला व्यवसाय कारखाने आणि उद्योगधंदे विज्ञानाच्या चक्राप्रमाणे गतिमान करून देशाची प्रगती करायची आहे.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार हि बुद्ध धम्माशी संबंधित आहे. भारत सरकार देशातील सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च व्यक्तीस ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करतो, असाच सन्मान बौद्ध धम्मात बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न असे त्रिरत्न बौद्ध धम्मात सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तीला देण्याची परंपरा आहे. आज ही महाराष्ट्रात भन्ते ज्योतीरत्न, भन्ते शन्तिरत्न, भन्ते संघरत्न या नावाचे भिक्षु आहेत. या भारतरत्न पुरस्काराचे चिन्ह स्वरूप देखील बौद्ध धाम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे एक सोनेरी पान ज्यावर पुरस्कार स्विकारणाऱ्या व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते. दुसऱ्या बाजूला चार सिंह हि राजमुद्रा व धम्मचक्र असते. ही राजमुद्रा आपल्या देशातील चलनी नोटा आणि नाणी यावर छापलेले असतात तसेच भारत देश आणि प्रत्येक राज्याला शासकीय कागदोपत्री पृष्ठावर असणे आवश्यक असते. बहुतेक बौद्ध राष्ट्रांत भगवान बुद्धाच्या चरणी कमलचे फुल अर्पण केले जते. कमळाच्या फुलाला पाली भाषेत ‘पदम’ असे म्हणतात.
भारतरत्न या पुरस्काराच्या खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत. त्या पुरस्काराची नावे “पदम-विभूषण” “पदमभूषण ” आणि “पदमश्री” असून सर्व क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तीला हे पुरस्कार सन्मानपूर्वक दिले जाते. या पुरस्कारावर ही “कमळाचे चिन्ह” असते. “अशोक चक्र, परमवीर चक्र आणि वीर चक्र” हे युद्ध शौर्यातील भारतीय जवानांना राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात येत असलेल्या पुरस्कारावर ही “कमळाचे चिन्ह” असते. इतकेच नव्हे तर चित्रपट सृस्टीत सर्वात उच्च पुरस्कार म्हणजे ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारावर कमळाचे सोनेरी चित्र असते. तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘सुवर्णकमळ’ हा पुरस्कार दिला जतो. भारताच्या राष्ट्रपती भवनातील प्रमुख दिवाणखान्याचे नाव ‘अशोका हॉल’ आहे. सम्राट अशोकांच्या मंत्री मंडळाच्या नगरीचे नांव ‘जनपथ’ होते. दिल्ली मधील केंद्रीय मंत्री मंडळाच्या निवासस्थान परिसराचे नाव हि ‘जनपथ’ असेच आहे. उदा. ७ जनपथ, १० जनपथ, ११ जनपथ इ.
चक्रवर्ती सम्राट अशोकाची राजधानी “सारनाथ” येथील चार सिंह ही राजमुद्रा भारत सरकारची राजमुद्रा म्हणून घोषित झाली. ‘सत्यमेव जयते’ हे सम्राट आशोकांचे घोषवाक्य, ते भारतीय शासन व्यवस्थेचे ब्रीद वाक्य म्हणून मानांकित करण्यात आले. आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही बौद्ध संस्कृतीशी संबधीत आहे. अशा प्रकारे बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारत “बौद्धमय” केला आहे. यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही अशी भारतीय संविधानात तरतूद करून ठेवली आहे.
* * * * *
Friday, April 16, 2021
कोरोना अपडेट: केंद्र शासनाने जारी केले राज्यस्तरीय हेल्पलाईन नंबर्स!
State vise Corona Help Line Numbers by central government)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती जगभरात उत्साहात साजरी!
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चैत्यभूमी स्मारक येथे विनम्र अभिवादन केले.
हरियाणा मुख्यमंत्री डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करताना,
बीजेपी कार्यालय दिल्ली
भारतीय सैन्य दलातील द महार रेजिमेंटने 1 महार बटालियन मध्ये विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंची 130 वी जयंती साजरी केली.
अम्बेडकर जयंती के अवसर पर किसान आन्दोलन ,गाजीपुर बार्डर पर किसान नेता राकेश टिकैत ने परिसंघ कैम्प का उद्घाटन किया ।
https://www.facebook.com/groups/983843948335517/permalink/3947754211944461/
Thursday, April 15, 2021
करोना वॉर रूम कल्याण डोंबिवली
करोना वॉर रूम कल्याण डोंबिवली
अ प्रभाग ९००४९३२८१९
ड प्रभाग ९००४२२७३१३
ग प्रभाग ७७१८८१९३८५
जे प्रभाग ९१३६८६२८८६
क प्रभाग ९१५२२८२४५१
एफ प्रभाग - ९१३६५१८९८५
आय प्रभाग ७७१०८३७८७२
ब प्रभाग ७३०४०५२५४३
ई प्रभाग ७७१८०८७४५३
ह प्रभाग ९०७६३९६७६६
*रेमेडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची ठिकाणे*
महापालिका कोविड रुग्णालये
आरोग्य फार्मसी, डोंबिवली ८६९१०९१०५५
आशीर्वाद मेडिकल सेंटर, डोंबिवली - ९३२२५३१३९७
अमेय फार्मसी, कल्याण पूर्व ०८९७६८९३५४५
*प्लाझ्मा मिळणाऱ्या रक्तपेढ्या*
प्लाझ्मा ब्लड बैंक डोंबिवली ०२५१ -२४३१९३२
अर्पण ब्लड बँक कल्याण-०२५१-२३१०२१०
संकल्प ब्लड बैंक कल्याण ७९४७१७३७९१
Tuesday, April 13, 2021
धम्मसेनापतींचा_धातुअवशेष_स्तूप
सांची संघारामातील स्तूप क्रं. ३ हा धम्मसेनापतींचे धातूअवशेष २२०० वर्ष सांभाळून ठेवणारा महत्वपूर्ण स्तूप आहे.
सांची येथे अलेक्झांडर कनिंगहम व फेड्रिक मैसी यांच्याद्वारे उत्खनन सुरू असताना स्तूप क्रं. ३ च्या दक्षिण बाजूला एक व उत्तर बाजूला एक अश्या दोन दगडी पेट्या सापडल्या ज्यावर सारिपुतस व महामोगलानस असे शब्द ब्राह्मी लिपि व पालि भाषेत कोरलेले आढळून आले. या वरुन हे धातूअवशेष भगवान बुद्धांचे धम्मसेनापती सारिपुत्त व महामोग्गलान यांचे आहेत हे स्पष्ट झाले.
बौद्ध सिद्धांतानुसार कनिंगहम व मैसी या विद्वानांनी असा तर्क लावला की भगवान बुद्ध नेहमी पूर्वाभिमुख होउन ध्यान व उपदेश करीत असत. सांचीचा मुख्य स्तूप हा भगवान बुद्धांचे प्रतीक आहे तर बौद्ध वाङमयानुसार सारिपुत्त हे भगवान बुद्धांचे उजवे व महामोग्गलान हे डावे हात म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे धातूआशेष सुद्धा मुख्य स्तूपासमोरच्या स्तूपात उजव्या व डाव्या बाजूला प्राप्त झालेत.
या धातूअवशेषांसोबत सोबत सतधारा येथेही सारिपुत्त – महामोग्गलान यांचे धातूअवशेष प्राप्त झाले ज्यांना १८६६ साली विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, इंग्लंड मध्ये ठेवण्यासाठी बोटीने पाठविण्यात आले. त्यापैकी एक बोट ज्यात सांचीचे धातूअवशेष होते त्या बोटीला अपघात होउन ती बोट बुडाली व सांचीचे धम्मसेनापतींचे धातूअवशेष समुद्रात विलीन झाले.
आज जे धातुअवशेष आपण चेतीयगिरी विहारात पाहतो त्या सतधारा येथील स्तूपातून प्राप्त झालेले धातूअवशेष आहेत जे महाबोधि सोसायटीच्या प्रयत्नाने १९४७ साली श्रीलंका सरकारद्वारे पुन्हा प्राप्त करण्यात आले.
प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी सांची महोत्सवात या धातूअवशेषांची श्रीलंका व मध्यप्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणूक काढण्यात येते.
अरविंद भंडारे
अध्यक्ष, पालि रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई
२९/१०/२०२०
Friday, April 9, 2021
www.brambedkar.in डॉ. बाबासाहेबावर आधारित वेबसाईटला मिळतोय प्रचंड प्रतिसाद !
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या विषयी आम्ही तयार केलेल्या वेबसाईट (www.brambedkar . in) ला गुगल सर्च इंजिन मध्ये व सोशल मीडिया मध्ये खुप प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त्य निर्माण केलेल्या ह्या वेबसाईट ला ५ वर्ष पूर्ण झाले.
५ वर्षांपासून सतत अविरत काम माझे आणि आमच्या टीम चे चालु आहे.
आंबेडकरी चळवळीचे डिजिटायझेशन करण्याचा संकल्प ठेऊन आम्ही हे कार्य चालु केलेय, तेव्हा पासुन BRAmbedkar . in वेबसाईट ला जगभरातुन छान प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत ११ लाख पेक्षा जास्त लोकांनी ह्या संकेतस्थळाला भेट दिली आहे.
गुगल सर्च इंजिन मध्ये सर्व च किवर्ड ला वेबसाईट टॉप ला आहे.
List of top performing keywords
"Buddha and his dhamma marathi book"
"ambedkar audio songs"
"ambedkar family tree"
"who were shudras pdf book"
"mukti kon pathe pdf book"
"fakira pdf book"
Thursday, April 8, 2021
20 ऐसे कानून और अधिकार जो हर भारतीय को जानने चाहिए
भारतीय संविधान ने लोगों के अधिकारों की रक्षा के लिए बहुत से कानूनी उपाय बताये हैं परन्तु दुर्भाग्यवश कुछ उपाय तो लोगों को अभी तक पता ही नहीं चल पाये हैं । इस लेख में हमने ऐसे ही कुछ कानूनों और अधिकारों की चर्चा की है जो कि साधारण लोगों / महिलाओं को शोषण से बचायेंगे.
शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर!
प्रत्येक आंबेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे ...खुप गैरसमज आहेत शिवाजी महाराज अणि डॉ बाबासाहेबांन बद्दल.....
राजा असावा तर सम्राट अशोका सारखा!
अशोकाच्या काळात भारताने जगातली ३३ टक्के बाजारपेठ काबीज केली हाेती म्हणूनच जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व होते.प्रत्येक व्यापारी कर भरताे किंवा नाही हे कसोटी ने पाहिले जात हाेते.कर वाढवण्यासाठी शेतीमाल व व्यापारवाढीचे प्रयत्न केले जात.सम्राट अशोकाचे गुप्तहेर सर्व प्रदेशभर पसरले होते आणि म्हणून प्रत्येक विभाग आणि प्रधानमंत्र्याच्या कामाचा तपशील त्याला मिळत असे.प्रत्येक गावाची माहिती त्याच्याकडे असे.याच कारणामुळे राजधानीपासून बाराशे मैल लांब असणाऱ्या काबूलवर जसा त्याचा वचक होता तसेच शेकडो मैल दूर असणाऱ्या गिरनारमध्येही दबदबा हाेता. राज्याभिषेकाच्या नवव्या वर्षी केलेल्या कलिंग युद्धानंतर पुढील अठ्ठावीस वर्षे सम्राट अशोकाचे राज्य निर्विघ्नपणे,कुठलेही युद्ध न करता,प्रजेच्या हिताची काळजी घेणारे आदर्श राज्य ठरले.कलिंगाच्या युद्धानंतर अशोकाने स्वत:ला पूर्णपणे लोककल्याणासाठी झोकून दिले.आपल्या प्रजेला कुठलाही त्रास होऊ नये,कुणावर अन्याय होऊ नये यासाठी ताे दक्ष असे.बौद्ध धम्माचे विचार पटल्यामुळे,अशोकाला आपल्या प्रजेने नीतीनुसार आचरण करावे असे वाटे.भारताच्या लिखाणाचा इतिहास सम्राट अशोकाच्या शिलालेखापासून प्रारंभ हाेताे.२२०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने दिलेला संदेश आजही किती चपखल लागू पडताे! एकंदरीत आदर्श,लोककल्याणकारी राजा कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक.सम्राट अशोकाने सुशासनाच्या संदर्भात घालून दिलेल्या परिमाणांचे जतन अाणि संवर्धन केले जावे अशीच त्याची अपेक्षा असणार आहे
Wednesday, April 7, 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीची सर्व माहिती आमच्या वेबसाईटवर !
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त्य सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा.
अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?
भारतीय रिझर्व बँकेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, "भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण, भौगोलिक रचना, भारतीय व्यापार, शेती,भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबतींची सखोल माहिती जर कोणाला असेल तर ते डॉ.आंबेडकर हे आहेत. संविधान निर्मितीसाठी त्यांच्यासारखा विद्वान पंडित कोणी नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत डॉ.आंबेडकरांना संविधान समिती मध्ये निवडून आणा."
हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!
यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...
-
Listed here the best motivational Quotes of Dr. Babasaheb Ambedkar in digital images format. ...
-
CONSTITUTION DAY, SANVIDHAN DIVAS PHOTOS, IMAGES For more information about B. R, Ambedkar visit : www...
-
Watch rare and original photos of Dr. Babasaheb Ambedkar | Ambedkar Photos ...